२०१००७२९

स्वयंपूर्ण भूखंड

चार जणांच्या कुटुंबास, स्वावलंबी, स्वयंपूर्ण जीवन स्वाभिमानाने जगण्यास सोयीच्या भूखंडाचा किमान आकार काय असावा? तिथे घर करून राहणार्‍यांना प्रकाश, पाणी, वारे, वीज, ऊर्जा आणि इतर जगाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क साधण्याकरता आवश्यक ती साधने, त्या भूमीतील उत्पन्नातूनच मिळवणे शक्य होईल का? स्वसंरक्षणही करणे साधता येईल का? याबाबत निकष प्रस्थापित करणार्‍या अभ्यासाची साधने गोळा करणे हा या अनुदिनीचा उद्देश आहे.

१. कमाल उपलब्ध जमीन
भारताची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार सुमारे १ अब्ज दोन कोटी इतकी आहे. तर भारतभूमीचे क्षेत्रफळ सुमारे ८१ कोटी तेवीस लक्ष एकर इतके आहे (माहितीस्त्रोत: http://india.gov.in/). यावरून भारताची लोकसंख्या घनता दर एकरी सुमारे दीड माणूस अशी येते. एका एकरात सुमारे ४३,५६० वर्ग फूट भूमी असते, हे लक्षात घेता एका माणसास स्वतःचा चरितार्थ चालवण्याकरता, फार फार तर सरासरी २९,००० वर्ग फूट जमीन मिळण्यासारखी आहे. प्रत्यक्षात नद्या-नाले, डोंगर-तलाव, वनराई-जंगले, वाळवंटे-हिमनद्या इत्यादींनी व्यापलेली भूमी उपजीविका साधण्यासाठी योग्य धरता येणार नाही. यांव्यतिरिक्तची जमीन समसमान वाटली तर माणशी अर्ध्या एकराहून कमी जमीनच काय ती प्रत्येकाच्या वाट्याला, उपजीविकेकरता म्हणून मिळण्यासारखी आहे. अगदी कमाल जमीन उपलब्धता गृहित धरली तरीही, चार जणांच्या कुटुंबास सुमारे १,१६,००० वर्ग फूटापेक्षा जास्त जमीन, उपजीविकेकरता उपलब्ध होण्यासारखी नाही.

२. चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारी वीज
चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारी वीज = ४ किलोवॅट स्थापित क्षमता, आठ तास दररोज वापर गृहित धरता ४ x ८ = ३२ किलोवॅट-तास = ३२ वीज एकके. ४० वॅट कळस सौर शक्ती करता २’ x २’ आकाराचा तक्ता लागतो, म्हणून  ४ किलोवॅट कळस स्थापित क्षमतेकरता १०० असे तक्ते लागतील. त्यांचे क्षेत्रफळ ४०० वर्ग फूट इतके होईल. म्हणून ४०० वर्ग फूट जमीन लागेल. http://www.solar-kit.com/epages/62035995.sf/en_GB/?ObjectPath=/Shops/62035995/Products/-10170-panneau-solaire-monocristallin-20w- या दुव्यावरून ४० वॅट कळस सौर शक्ती करता, २०० युरो म्हणजेच अंदाजे १२,००० रुपये भांडवली खर्च येऊ शकेल. म्हणून ४ किलोवॅट कळस शक्तीकरता १०० x १२,००० = १२,००,००० रुपये भांडवली खर्च येऊ शकेल. 

३. चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारा तांदूळ
http://www.rice-trade.com/rice-consumption.html या दुव्यावरून असे लक्षात येईल की चार माणसांच्या कुटुंबाकरता दररोज लागणारा तांदूळ, सुमारे १ किलो असतो. म्हणून दरसाल सुमारे ३६५ किलो तांदूळ लागू शकतो. http://dacnet.nic.in/rice/HS-B-Table-01.htm या दुव्यावरून असे लक्षात येईल की भारतातील तांदुळाच्या पीकाखालील महाराष्ट्रातील जमीन, निम्नस्तरीय उत्पादन देते. जास्तीत जास्त अलीकडील, जास्तीत जास्त उत्पादन गृहित धरले, तर ते हेक्टरी दोन टन इतके असू शकते. महाराष्ट्रातील निम्नस्तरीय जमीन विचारात घेता, (आकडेमोडीच्या सोयीकरता) हेक्टरी ७३० किलो गृहित धरूया.  यावरून अर्धा हेक्टर सुपीक शेती, चार माणसांकरता पुरेसा तांदूळ पिकवू शकेल. अर्थातच त्याकरता अर्धा हेक्टर म्हणजे अंदाजे ५४,००० वर्ग फूट जमीन लागेल.

४. स्वयंपूर्ण भूखंडाच्या गुणनाची संकल्पना
उपलब्ध जमीनीचा कमाल आकार पाहू जाता, पहिल्याप्रथम असे गृहित धरूया  की त्यापैकी केवळ एक चतुर्थांश जमीनच (म्हणजे २९,००० वर्ग फूट) त्या चार जणांच्या कुटुंबास प्रत्यक्षात उपलब्ध आहे. वरीलप्रमाणे गरजा जर त्यातून भागवता आल्या, तर जे उत्पन्न वाचेल त्यातूनच त्यांच्या इतर गरजा भागवता येतील. अशाप्रकारे एक जरी एकक प्रत्यक्षात कार्यान्वित करून यशस्वी झाले, तर मग त्याच अनुभवाचे गुणन करून स्वयंपूर्ण भूखंडांची संख्या वाढवत नेता येईल आणि देश स्वयंपूर्णता गाठू शकेल.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी ’सोलर व्हली’ उभारण्याचे केलेले आवाहन या संदर्भात महत्त्वाचे आहे. http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-12-01-2010-2e974&ndate=2010-01-12&editionname=main

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: